संपन्न वारसा - अंतरंग!

कर्णाची आख्यायिका

महाभारतामधील कर्ण दानशूर म्हणून सर्वश्रुत आहे. पण याच कर्णाला अन्नदान करण्यासाठी स्वर्गातून परत पृथ्वीवर यावे लागल्याची ही आख्यायिका!

पितृपक्ष प्रथेमागील कहाणी

भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृ पक्ष, पक्ष पंधरवडा अगदी बोली भाषेत पाहिलं तर पित्तर पाठ! भारतीय हिंदूंमध्ये ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते. ही प्रथा केव्हा सुरु झाली आणि याच काळात हे सर्व श्राद्धादी विधी का केले जातात?

पितृपक्ष

भाद्रपद पौर्णिमेला अगस्त्य ऋषींचे पूजन केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पितृपक्षास सुरवात होते. या पक्षामध्ये आपल्या दिवंगत पूर्वजांचे श्रद्धापूर्वक समरण केले जाते. तसेच अगदी आपल्या हातून नकळत मारले गेलेले किडा -मुंगी ,पाडलेले वृक्ष, आपण पाळलेली पण मृत्यू पावलेली जनावरे, आपल्या घरी मदतनीस म्हणून असणाऱ्या परंतु आता हयात नसणाऱ्या व्यक्ती यांचे देखील श्रद्धापूर्वक स्मरणकेले जाते.

अनंत व्रत कथा

अनंत व्रत करण्यामागे अशीच एक पौराणिक कथा आहे. मनुष्याने ठेवलेली गाढ श्रद्धा त्याला सर्व अडचणींमधून सुखरूप बाहेर काढते. याच श्रद्धेला पूर्वसुरींनी पुराणकथेचे मनोरंजक रूप दिले आणि जनमानसामध्ये अशा कथांचे स्थान अढळ बनविले.

अनंत व्रत

अनंत चतुर्दशी म्हटले की पटकन डोळ्यासमोर गणपती विसर्जन येते. पण हिंदू धर्मात या दिवसाला आणखी वेगळे महत्त्व आहे. याच दिवशी वैष्णव पंथीय लोक ‘अनंत व्रत’ करतात.

गणपती बाप्पा मोरया!

आपण सर्वजण आता आतुरतेने गणपती बाप्पांच्या आगमनाची वाट पाहत आहोत. त्या निमित्ताने पाहूयात हे ४ श्लोक जे ४ वेगवेगळ्या युगांमधल्या गणपतीचे वर्णन करतात!

औट घटकेचा राजा – शिराळशेट

महाराष्ट्रामध्ये बारामती जिल्ह्यातील काऱ्हाटी येथे, तसेच पुणे जेजुरी, अहमदनगर अशा काही ठिकाणी हा ‘शिराळशेटीचा उत्सव ‘श्रावण शुद्ध षष्ठीला साजरा केला जातो. या निमित्ताने ह्या श्रियाळशेठच्या धर्मशीलतेची आणि दातृत्वाची उजळणी केली जाते आणि मानवतेचे दर्शन घडविले जाते.

गोष्ट श्रियाळ राजाची

गोष्ट श्रियाळ राजाची

श्रावण शुद्ध षष्ठी, म्हणजेच नागपंचमीचा दुसरा दिवस. श्रियाळ षष्ठी म्हणून हा दिवस प्रसिद्ध आहे. शिवलीलामृतामध्ये श्रियाळ राजाची गोष्ट आपल्याला आढळते. श्रियाळ राजा, त्याची राणी चांगुणा आणि त्यांचा लाडका बाळ चिलिया सर्व कुटुंब शंकराचे भक्त होते.

नाग /साप – समज गैरसमज

आपल्या मनात साप /नाग या प्राण्याविषयी असंख्य गैरसमजुती असल्याने आपण आपल्या सोयीसाठी त्याच्या जीवावर उठतो ,त्याला साक्षात मृत्यूदूत समजतो. नाग / साप अशासारखे प्राणी पर्यावरण साखळीतील एक महत्वाचा दुवा आहेत.

नागपंचमी

श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच ‘नागपंचमी’. ‘नागपंचमी’ हा खास स्त्रियांचा मानला गेलेला सण. पृथ्वीचा आधार, रक्षणकर्ता अशी नागदेवतेची पुराणातील वर्णने असोत अथवा सद्यस्थितीतील नागपंचमीला होणारे त्याचे पूजन असो, प्रत्येक भारतीय स्त्रीच्या मनाचा एक कोपरा या जातिवंत प्राण्याने व्यापला आहे.

Theme: Overlay by Kaira