Category: भारतीय सण

दत्त जयंती

मार्गशीर्ष पोर्णिमा, मृग नक्षत्र आणि सायंकाळची वेळ, सर्व दत्त भक्तांना मध्ये अतिशय महत्त्वाची असणारी ही त्रयी! दत्तगुरूंचा जन्म झाला तोच हा दिवस,’ दत्तजयंती’ — सर्व दत्त स्थाने आणि दत्तभक्त दत्त जयंतीचा उत्सव उत्साहाने साजरा करतात.

त्रिपुरी पौर्णिमा

कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा ‘कार्तिकी पौर्णिमा’. याच पौर्णिमेला ‘त्रिपुरी पौर्णिमा’(त्रिपुरारी पौर्णिमा) असेही म्हणतात. जर या दिवशी कृत्तिका नक्षत्र असेल तर या पौर्णिमेला ‘महाकार्तिकी पौर्णिमा’ असे म्हणतात.

नाग /साप – समज गैरसमज

आपल्या मनात साप /नाग या प्राण्याविषयी असंख्य गैरसमजुती असल्याने आपण आपल्या सोयीसाठी त्याच्या जीवावर उठतो ,त्याला साक्षात मृत्यूदूत समजतो. नाग / साप अशासारखे प्राणी पर्यावरण साखळीतील एक महत्वाचा दुवा आहेत.

नागपंचमी

श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच ‘नागपंचमी’. ‘नागपंचमी’ हा खास स्त्रियांचा मानला गेलेला सण. पृथ्वीचा आधार, रक्षणकर्ता अशी नागदेवतेची पुराणातील वर्णने असोत अथवा सद्यस्थितीतील नागपंचमीला होणारे त्याचे पूजन असो, प्रत्येक भारतीय स्त्रीच्या मनाचा एक कोपरा या जातिवंत प्राण्याने व्यापला आहे.

दिव्याची आवस

उगवत्या सूर्याला वंदन करून आपली दिनचर्या सुरु करणारी भारतीय परंपरा. आकाशात काळ्या ढगांची गर्दी असल्याने वातावरणातील कोंदटलेपण आणि अशा हवामानामुळे येणारी मनावरील मरगळ दीपदर्शनाने, दीपपूजनाने झटक्यात दूर होते. जेव्हा तेजाची पूजा ‘तमसो S मा ज्योतिर्गमय’ म्हणून केली जाते तेव्हा मानवाचे जीवन प्रकाशाने उजळून निघते!

व्यासपौर्णिमा (गुरुपौर्णिमा)

‘जो जो ज्याचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण’ श्री दत्तगुरूंनी व्यक्तीला गुरु न मानता परिसरातील प्रत्येक चांगला गुण स्वीकारला. असे २४ गुरु त्यांनी केले ,परंतु असे विद्या शिकवणारे गुरु वेगळे. त्यांच्यामुळे आपण जीवन जगायचे कसे हे शिकतो, हा जीवनसागर पार करून पुढील प्रवासासाठी फक्त सद्गुरूच समर्थ असतो.

वटपौर्णिमा

‘ वटपौर्णिमा ‘. संपूर्ण भारतातील हिंदू स्रीच्या जिव्हाळ्याचा दिवस. आपण आपल्यापुरता तरी संकल्प करूयात की संपूर्ण वृक्षाचे पूजन करीन,फांद्या न तोडता उलट किमान पाच वडाची रोपे लावून त्याचे जतन ,संवर्धन करीन ,पुढील पिढीला त्याचे महत्त्व समजून सांगीन,
हीच खरी आधुनिक सावित्रीची वटपौर्णिमा असेल ना?

अक्षय्यतृतीया

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानली जाणारी तिथी म्हणजे अक्षय्यतृतीया. वैशाख शुद्ध तृतीयेस ‘अक्षय्यतृतीया’ म्हणले जाते. ‘आखा-तीज’, ‘आखिदी’, ‘अकिदी’ ही याची बोलीभाषेतील नावे.

चैत्रगौरी आणि खाद्यपरंपरा

चैत्र शुद्ध तृतीया, चैत्रगौरीचे आगमन. चैत्रगौरीसंदर्भात काही महत्त्वाच्या परंपरा चालत आलेल्या दिसतात. त्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन तर दिसतोच पण त्याचबरोबर ऋतूबदलातील आहार नियोजन केल्याचे दिसून येते.

चैत्रगौरी

चैत्र शुद्ध तृतीया, ‘गौरीतीज’. संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत्वाने ब्राह्मण समाजात यादिवशी चैत्रगौरीची स्थापना केली जाते. चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया (अक्षयतृतीया) अशी महिनाभर ही चैत्रगौर माहेरी येते असे समजून तिची पूजा केली जाते.

Theme: Overlay by Kaira