Category: परंपरा

श्री अक्कलकोट स्वामी प्रकटदिन

चैत्र शुद्ध द्वितीया हा ब्रह्माण्डनायक अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन! श्रद्धायुक्त अंतःकरणाने शरण गेल्यास या ब्रह्मांडनायक लोकाधिराजाची कृपादृष्टी आपल्यावर कायमच कृपेची बरसात करीत राहील. आणि कोणत्या न कोणत्या स्वरूपात स्वामी आपल्याला दर्शन देऊन सांगतील ‘मै गया नाही, जिंदा हूं’!

भोंडला

भोंडला, भुलाबाई, हादगा अशा वेगवेगळ्या नावांनी महाराष्ट्रातील विविध भागात एकच परंपरा जतन केलेली दिसून येते. भिल्लीणीचे रूप घेऊन शंकराला भुलवणारी ती भुलाबाई आणि अर्थातच शंकर बनतो ‘भुलोजी’.

अधिकस्य अधिकं फलम्

अधिक मासाचे प्रथम ‘मलमास’ म्हणून असणारे स्वरुप आणि नंतर श्रीकृष्णाने त्याला दिलेले ‘पुरुषोत्तम मास’ हे नाव , या दोन कारणांमुळे या महिन्यात केल्या जाणाऱ्या धार्मिक कर्माची आणि व्रतांची गुंफण दुपेडी असल्याचे आपल्या लक्षात येते.

अधिक मास उत्पत्ती कथा

सध्या चालू असलेल्या अधिक मासाची नेमकी उत्पत्ती कधी झाली, कोणी केली , त्याला ‘मलमास’ का म्हणतात? तसेच मलमासाचे नाव ‘पुरुषोत्तम मास’ कसे झाले या आणि आणि अशा अधिक मासाविषयी काही मनोरंजक कथा !!

अधिक मास

हिंदू पंचांगानुसार ज्या चांद्र महिन्यात एकही सूर्य संक्रमण येत नाही त्याला ‘असंक्रांती मास’ म्हणतात. बहुतेक वेळा साडे बत्तीस महिन्यांनी हा मास येतो. दर तीन वर्षांनी येणाऱ्या तेराव्या महिन्याला ‘अधिकमास, मलमास, पुरुषोत्तम मास ,खरमास, मलिम्लुच मास’ अशी अनेक नावे आहेत.

पितृपक्ष आणि कावळा

पितृपक्ष सुरु झाला की कावळ्याचा भाव एकदम वधारतो. एरव्ही अशुभ, अमंगल मानल्या जाणाऱ्या कावळ्याला अगदी अगत्याने अन्न भरविण्यात येते. का या कावळ्याचा मृत व्यक्तीच्या आत्म्याशी संबंध जोडला जातो?

श्राद्धकर्त्यासाठी काही नियम

श्राद्ध हा विधी आपल्या पूर्वजांना सद् गती लाभावी म्हणून करण्यात येणारा विधी आहे. हा विधी करीत असताना खालील नियम पाळावेत असे शास्त्र आहे.

कर्णाची आख्यायिका

महाभारतामधील कर्ण दानशूर म्हणून सर्वश्रुत आहे. पण याच कर्णाला अन्नदान करण्यासाठी स्वर्गातून परत पृथ्वीवर यावे लागल्याची ही आख्यायिका!

पितृपक्ष प्रथेमागील कहाणी

भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृ पक्ष, पक्ष पंधरवडा अगदी बोली भाषेत पाहिलं तर पित्तर पाठ! भारतीय हिंदूंमध्ये ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते. ही प्रथा केव्हा सुरु झाली आणि याच काळात हे सर्व श्राद्धादी विधी का केले जातात?

पितृपक्ष

भाद्रपद पौर्णिमेला अगस्त्य ऋषींचे पूजन केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पितृपक्षास सुरवात होते. या पक्षामध्ये आपल्या दिवंगत पूर्वजांचे श्रद्धापूर्वक समरण केले जाते. तसेच अगदी आपल्या हातून नकळत मारले गेलेले किडा -मुंगी ,पाडलेले वृक्ष, आपण पाळलेली पण मृत्यू पावलेली जनावरे, आपल्या घरी मदतनीस म्हणून असणाऱ्या परंतु आता हयात नसणाऱ्या व्यक्ती यांचे देखील श्रद्धापूर्वक स्मरणकेले जाते.

Theme: Overlay by Kaira