Tag: marathi mahiti

गोष्ट श्रियाळ राजाची

गोष्ट श्रियाळ राजाची

श्रावण शुद्ध षष्ठी, म्हणजेच नागपंचमीचा दुसरा दिवस. श्रियाळ षष्ठी म्हणून हा दिवस प्रसिद्ध आहे. शिवलीलामृतामध्ये श्रियाळ राजाची गोष्ट आपल्याला आढळते. श्रियाळ राजा, त्याची राणी चांगुणा आणि त्यांचा लाडका बाळ चिलिया सर्व कुटुंब शंकराचे भक्त होते.

नाग /साप – समज गैरसमज

आपल्या मनात साप /नाग या प्राण्याविषयी असंख्य गैरसमजुती असल्याने आपण आपल्या सोयीसाठी त्याच्या जीवावर उठतो ,त्याला साक्षात मृत्यूदूत समजतो. नाग / साप अशासारखे प्राणी पर्यावरण साखळीतील एक महत्वाचा दुवा आहेत.

नागपंचमी

श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच ‘नागपंचमी’. ‘नागपंचमी’ हा खास स्त्रियांचा मानला गेलेला सण. पृथ्वीचा आधार, रक्षणकर्ता अशी नागदेवतेची पुराणातील वर्णने असोत अथवा सद्यस्थितीतील नागपंचमीला होणारे त्याचे पूजन असो, प्रत्येक भारतीय स्त्रीच्या मनाचा एक कोपरा या जातिवंत प्राण्याने व्यापला आहे.

दिव्याची आवस

उगवत्या सूर्याला वंदन करून आपली दिनचर्या सुरु करणारी भारतीय परंपरा. आकाशात काळ्या ढगांची गर्दी असल्याने वातावरणातील कोंदटलेपण आणि अशा हवामानामुळे येणारी मनावरील मरगळ दीपदर्शनाने, दीपपूजनाने झटक्यात दूर होते. जेव्हा तेजाची पूजा ‘तमसो S मा ज्योतिर्गमय’ म्हणून केली जाते तेव्हा मानवाचे जीवन प्रकाशाने उजळून निघते!

कहाणी चित्रकथींची

लोककलाकारांमधील ‘चित्रकथी’ हा प्रकार आजघडीला अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. परंतु समृद्ध अशा निसर्गसंपन्न
तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यामधील पिंगुळी या गावातील आदिवासी ठाकर समाज ‘चित्रकथी’ ही पारंपरिक कला जोपासत आहे. चित्रांच्या आधारे कथाकथन अथवा गायन सादर करणारे ठाकर आदिवासी ‘चित्रकथी’ कलाप्रकार सादर करतात.

व्यासपौर्णिमा (गुरुपौर्णिमा)

‘जो जो ज्याचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण’ श्री दत्तगुरूंनी व्यक्तीला गुरु न मानता परिसरातील प्रत्येक चांगला गुण स्वीकारला. असे २४ गुरु त्यांनी केले ,परंतु असे विद्या शिकवणारे गुरु वेगळे. त्यांच्यामुळे आपण जीवन जगायचे कसे हे शिकतो, हा जीवनसागर पार करून पुढील प्रवासासाठी फक्त सद्गुरूच समर्थ असतो.

मेघदूत

आषाढाचा पहिला दिवस उगवला आणि जर एखाद्याला कालिदासाच्या ‘मेघदूताची’ आठवण झाली नाही तर तो खरा भारतीय साहित्यरसिकच नाही. महाकवी कालिदासाने रचलेले हे खंडकाव्य आजही रसिक मनाला भुरळ घालत आहे, प्रेरणा देत आहे.

शनिभक्तांची पंढरी – शनी शिंगणापूर

अहमदनगर जिल्ह्यात सोनईजवळ शनी शिंगणापूर ही एक शनिभक्तांची पंढरी आहे. खुद्द शनिदेवांचा येथे निवास असल्याने या गावात चोरी होत नाही. येथील घरांना दारे नाहीत. पडदे लावले जातात.कोणत्याही घराला,अगदी बँकेला देखील कुलूप लावले जात नाही.

करामती शनी महाराज

पौराणिक दृष्टीने पाहता सूर्यपुत्र असणारा हा शनिदेव स्वतः रूपाने काळा आहे. यमाचा वडीलबंधू आहे. परंतु त्याची न्यायी प्रवृत्ती मात्र आपल्या पित्याप्रमाणे (सूर्यप्रकाशाइतकी) स्वच्छ आहे. भौगोलिक दृष्ट्या जर पहिले तर शनीसारखा सुंदर दुसरा ग्रह आपल्या आकाशगंगेत नाही. अतिशय विलोभनीय असणारी त्याची कडी हे त्याचे वैभव आहे. या शनी देवांविषयी प्रचलित असणाऱ्या अनेक मनोरंजक पुराणकथा या लेखात!

वटपौर्णिमा

‘ वटपौर्णिमा ‘. संपूर्ण भारतातील हिंदू स्रीच्या जिव्हाळ्याचा दिवस. आपण आपल्यापुरता तरी संकल्प करूयात की संपूर्ण वृक्षाचे पूजन करीन,फांद्या न तोडता उलट किमान पाच वडाची रोपे लावून त्याचे जतन ,संवर्धन करीन ,पुढील पिढीला त्याचे महत्त्व समजून सांगीन,
हीच खरी आधुनिक सावित्रीची वटपौर्णिमा असेल ना?

Theme: Overlay by Kaira